धनंजय मुंडेंना भेटल्यावर वाल्मिक कराड शरण? सुरेश धस यांच्या वक्तव्याने खळबळ! Walmik Karad – Suresh Dhas
Walmik Karad । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सीआयडीला मोठे यश आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तब्बल तीन आठवड्यानंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. (Walmik Karad arrested) वाल्मिक कराड आज पुणे सीआयडीला सिनेमा स्टाईल पध्दतीने शरण आल्याचे चित्र सर्वांना पहायला मिळाले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या घटनेबाबत सातत्याने आवाज उठवणारे आणि चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर वाल्मिक कराड शरण आले का? या प्रश्नाचं धनंजय मुंडेच (Dhananjay Munde) उत्तर देऊ शकतील. इतकेच नाही तर त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारच घेऊ शकतील,” असेही मत सुरेश धस यांनी व्यक्त केले आहे.
याप्रकरणी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. “वाल्मिक कराडला अटक झाली हे चांगलं काम झालं. ते पोलिसांना शरण गेले ही चांगली बाब आहे. त्यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक होणं गरजेचे होते. पारदर्शक तपास करणे हे CID चे काम आहे. जर ते गुन्ह्यात आरोपी नसतील तर त्यांना इतके दिवस यावर मत देण्यास उशीर का झाला? तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर तेव्हाच शरण यायचं होत,” अशी प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी दिली आहे.