जलसंपदा विभागात 2100 जागा रिक्त, लवकरच मेगाभरती! Jalsampada Vibhag Bharti 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गट ‘ब’ पदाच्या १६८५ आणि सहाय्यक अभियंता पदाच्या ५४५ जागा सध्या रिक्त आहेत. विभागातील कर्मचाऱ्यांवर प्रकल्पांचा वाढता ताण असल्याने या जागांची भरती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही पदभरती रखडल्याने लाखो उमेदवार चिंतेत आहेत.
जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे – Jalsampada Vibhag Bharti 2025
जलसंपदा विभागातील स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी क्षेत्रातील जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे जलसंपदा प्रकल्पांची अंमलबजावणी थांबली असून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आला आहे. विदर्भ आणि कोरडवाहू भागांसाठी महत्त्वाचा असलेला ‘वैनगंगा-नळगंगा खोरे जोड प्रकल्प’सारखे महत्त्वाचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागातील रिक्त जागांची भरती तातडीने करणे आवश्यक आहे.
नवीन सेवाप्रवेश नियम आणि उमेदवारांची चिंता
पदभरतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षी नवीन सेवाप्रवेश नियम लागू केले. या अंतर्गत पदविका, पदवी आणि उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी पात्र ठरवले गेले. मात्र, करोनामुळे आणि प्रशासनाच्या विलंबामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे बेरोजगार आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार अस्वस्थ आहेत.
भरती लवकर सुरू करण्याची मागणी
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसह बेरोजगार तरुणांनी जलसंपदा विभागाकडे तातडीने जाहिरात प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. रिक्त पदे भरल्यास जलसंपदा विभागातील प्रलंबित प्रकल्पांना गती मिळेल आणि विभागातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल.